संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' प्रसिद्ध करण्यात येतो. सामाजिक सद्भाव, भ्रष्टाचार व लोकांच्या अपेक्षा अशा मुद्द्यांचा विचार करून हा अहवाल बनविण्यात येतो. यंदाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून आनंदी देशांच्या यादीत फिनलँडनं बाजी मारलीय. आश्चर्यकारक म्हणजे, भारतीय नागरिक हे पाकिस्तानी नागरिकांपेक्षा कमी आनंदी असतात, असंही यातून स्पष्ट झालंय.
आनंदी देशांच्या बाबतीत भारत १३३व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्ताननं या यादीत ७५वा क्रमांक पटकावलाय. केवळ पाकिस्तानच नाही तर बांग्लादेश, भूतानसारखे इतर शेजारी देशही भारतापेक्षा जास्त सुखी असल्याचं चित्र आहे. आनंदी देशांच्या क्रमवारीत नेपाळ आणि श्रीलंकादेखील भारताच्या पुढे आहेत. २०१७ मधील 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट'मध्ये भारताची चार क्रमांकाने घसरण झाली होती. यंदा भारत तब्बल ११ पायऱ्या खाली उतरला आहे.
आनंदी देशांच्या बाबतीत भारत १३३व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्ताननं या यादीत ७५वा क्रमांक पटकावलाय. केवळ पाकिस्तानच नाही तर बांग्लादेश, भूतानसारखे इतर शेजारी देशही भारतापेक्षा जास्त सुखी असल्याचं चित्र आहे. आनंदी देशांच्या क्रमवारीत नेपाळ आणि श्रीलंकादेखील भारताच्या पुढे आहेत. २०१७ मधील 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट'मध्ये भारताची चार क्रमांकाने घसरण झाली होती. यंदा भारत तब्बल ११ पायऱ्या खाली उतरला आहे.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी